चमचाभर दही गुपचूप टाका इथे पैसा कधीच कमी पडणार नाही. फरक स्वतःच्या डोळ्यांनी बघाल

मित्रांनो तुमचा व्यापार, बिझनेस नोकरी धंदा किंवा दुकान या ठिकाणी जर तुम्ही काम करत असाल, पण त्या ठिकाणाहून तुम्हाला पैसा मिळत नसेल, तुमच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळत नसेल. किंवा तुम्ही जे काम करत आहे, त्यात तुम्हाला यश येत नसेल, नेहमी असफलता हाती येत असेल.. घरात अशांतता असेल, घरात पैसा टिकत नसेल, तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला खेचून आणणारा, हा साधा उपाय तुम्ही नक्की करा.

हा उपाय महादेवांशी संबंधित आहे, ज्या व्यक्तिने श्रद्धेने हा उपाय केलेला आहे. त्यांचा बिजनेस उद्योग-व्यापार अगदी उत्तम रित्या सुरू आहेत…! त्यांच्या धंद्यातून त्यांना भरपूर मोबदला मिळत आहे, हा उपाय केल्याने घरात शांतता आणि पैसा येऊ लागतो. मित्रांनो हा उपाय आपण आठवड्यातील कोणत्याही दिवशी करू शकता, अगदी कोणत्याही तिथिला करू शकता, जर हा उपाय आपण सोमवारच्या दिवशी केला, तर त्याचा अतिशय उत्तम प्रभाव पडतो.

कारण सोमवार हा भगवान महादेवाचा वार आहे, तर आपण नक्की काय करावे..? तर मित्रांनो हा अगदी सोपा आणि छोटासा उपाय आहे. मित्रांनो आपण वडाच्या झाडाखाली बसायचे आहे, हा उपाय वडाच्या झाडाखाली बसून करायचा आहे.. या झाडाखाली बसण्याआधी आपल्याला थोडे दही, थोडेसे पाणी, आणि एक पिंपळाचे पान घ्यायचे आहे.. लक्षात ठेवा पिंपळाचे पान नं तुटलेले न फाटलेले, देठासहित घ्यावे…!

तर असे पिंपळाचे पान घ्यायचे आहे, आणि वडाच्या झाडाखाली पूर्व दिशेकडे तोंड करून आपल्याला बसायचे आहे. वडाच्या झाडात साक्षात महादेव विराजमान असतात, पिंपळाचे जे पान घेतलेले आहे, त्या पानावर मातीने आपल्याला शिवलिंग बनवायचे आहे. तर आपण ज्या वडाच्या झाडाखाली बसलेले आहोत, त्या वडाच्या झाडाच्या खोडाजवळची जी माती असेल, तिथली थोडी माती घेऊन या पिंपळाच्या पानावर एक शिवलिंग तयार करायचे आहे. मित्रांनो हे शिवलिंग म्हणजे साक्षात बटुकेश्वर महादेव आहेत अशी कल्पना आपल्याला करायची आहे.

संपूर्ण उपाय करताना आपल्याला निरंतर “ओम नमः शिवाय” या मंत्राचा जप करायचा आहे. शिवलिंगाची आपल्याला विधिवत पुजा करायची आहे, आपण जे जल आणलेले आहे, ते या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. थोडसे पाणी अर्पण केले तरीही चालेल, त्यानंतर थोडीशी बेलपत्र पांढऱ्या रंगाची फुले सुद्धा या शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत. पूजा झाल्यानंतर आपण दही, चमचाच्या साहाय्याने सात वेळा शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. हे दही अर्पण करताना महादेवांच्या ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे.

आणि त्यानंतर मनोभावे हात जोडून आपल्या मनात जी कोणती इच्छा आहे, ती बोलायची आहे.. आपला व्यापार, धंदा, व्यवसाय नोकरी नीट चालावी, आपल्याला त्याचा योग्य मोबदला मिळावा, घरात शांतता यावी, घरातील वातावरण आनंदी प्रसन्न राहावे, घरात समृद्धी यावी बरकत यावी, आपल्या घरात आलेला पैसा टिकून राहावा, यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. मित्रांनो पूजा झाल्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा डोळे झाकून जप करायचा आहे. तुम्ही यासाठी रुद्राक्षाच्या माळेचा ही वापर करू शकता, मंत्रजप झाल्यानंतर आपण शिवलिंगावर जे दही अर्पण केलेले आहे..

त्यातील थोडेसे दही, एक दोन चमचे दही घेतले तरीही चालेल, आपल्यासोबत घ्यायचे आहे, आणि आपण जिथे नोकरी करतो, आपला जिथे व्यापार आहे, व्यवसाय आहे किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी, आपण या दह्याचे एक स्वस्तिक मुख्य दरवाज्यावर काढायचे आहे..! तुमचे दुकान असेल, व्यापार धंदा असेल तर त्या ठिकाणी ही मुख्य दरवाजावर हे स्वस्तिक काढायचे आहे. मित्रांनो हे स्वस्तिक काढताना त्याच्या दोन्ही बाजूंना दोन उभ्या रेषा द्यायला विसरू नका, कारण यामुळे आपल्याकडे धन येते, व ते टिकून राहते.

अर्थात आपल्याकडे आलेली लक्ष्मी ही स्थिर राहते, मित्रांनो हा उपाय केल्यानंतर अगदी दोन ते तीन महिन्यातच तुम्हाला दिसून येईल. तुमच्या व्यापार धंद्यात बरकत येईल, घरामध्ये भरपूर पैसा येत राहील, आलेला पैसा टिकून राहील, तुमच्या घरात सुख-समृद्धी आनंद आणि समाधान सुद्धा येईल. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून पहा फक्त लक्ष्यात ठेवा, की सूर्यास्तानंतर आपल्याला हा उपाय करायचा नाही. दिवस मावळण्याची आधी सुर्यास्ताच्या आधी दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकतात, तर हा उपाय नक्की करा आणि याचा तुम्हाला काय अनुभव येतो, तो सुद्धा आमच्या सोबत नक्की शेअर करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *