जे मागाल ते मिळेल 11 दिवस करा हा पाठ बनाल धनवान

हनुमान चालीसाचा सलग 11 दिवस पाठ केल्याने आपल्या मनातील कोणतीही इच्छा मनोकामना नक्की पूर्ण होते. हनुमान चालीसानाचा हा 11 दिवसांचा पाठ आपण आपल्या घरातही करू शकता, किंवा आपल्या गावात आपल्या परिसरात मारुतीचे मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, त्या ठिकाणी जाऊन केला. तर अति उत्तम आहे मात्र आपल्या घरात करणे,हे श्रेयस्कर ठरेल, अनेकांच्या मनात प्रश्न येतात, की हा उपाय स्त्रिया महिला करू शकतात, का? अगदी बिनदिक्कतपणे मनात कोणतीही शंका कुशंका न आनता.

महिलासुद्धा हा उपाय करू शकतील, केवळ एका गोष्टीचे आपले स्मरण ठेवा, की हनुमानाला शेंदूर आपण लावायचे नाही, महिलांनी लाल वस्त्र चढवायचे नाही. हे केवळ या दोन गोष्टी वगळता, आपले महिन्यातील जे पाच दिवस असतात, मासिक धर्माचे या मासिक धर्म दरम्यान आपण हनुमानाची पूजा कृपया करू नका. परंतु या ठिकाणी उपवास करण्याची आवश्यकता नाही, फक्त अकरा दिवस नित्यनियमाने हनुमान चालीसा चा पाठ आपल्या घरात बसून करायचा आहे. यासाठी आपल्या घरातील जो ईशान्य कोपरा आहे.

ईशान्य म्हणजे उत्तर आणि पूर्व या दरम्यानची दिशा आहे, उत्तर आणि पूर्व याच्यामधली जी दिशा आहे, त्या दिशेला जर आपले देवघर त्या ठिकाणी असेल, तरीसुद्धा तिथे आपण कोपरा साफ स्वच्छ सुंदर करायचा आहे. एक पाठ त्या ठिकाणी ठेवून, पाटावरती लाल वस्त्र अंथरून त्यावर ती हनुमानाची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. या फोटो किंवा मूर्तीजवळ प्रभू श्रीरामचंद्र आणि माता सीता यांचा फोटो किंवा मूर्ती आपण ठेवली तर अतिउत्तम होईल. मित्रांनो पहिल्या दिवशी शक्यतो, मंगळवारी हा उपाय करण्यास आपण प्रारंभ करा.

तसे आठवड्यातील कोणत्याही वारी आपण करू शकता, काही हरकत नाही, मंगळवार शुभ मानला जातो किंवा शनिवारी सुद्धा आपण हा उपाय करू शकता. अगदी जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट असुद्या कष्ट समस्या असू द्या. या सर्वांचा निराकरण करण्यासाठी किंवा शनीची साडेसाती दहिया महादशा अंतर्दशा असुद्या, या सर्वांचा निराकरण करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे, कारकर आहे. अशा प्रकारे हनुमानाची मूर्ती किंवा फोटो स्थापण केल्यानंतर त्यांना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहे, त्या आपण त्यांना अर्पण करण्याचा प्रयत्न करा.

या मूर्तीला लाल फुले अर्पण करायचे आहेत, दोन लवंगा त्यांना साबूत लवंगा अर्पण करायचे आहे, प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून गुळ फुटाणे किंवा भाजलेले हरभरे आणि गूळ या ठिकाणी दाखवायचा आहे. तुपाचा दिवा प्रज्वलित केला, तर उत्तम आहे, मात्र त्याहीपेक्षा श्रेयस्कर आहे तिळाच्या तेलाचा दिवा मग काळ्या तीळचे जर तेल असेल,तर खूप उत्तम सर्वश्रेष्ठ जर काळ्या तीळाचे नसेल. तर सफेद तिळाच्या तेलाचा दिवा आपण लावू शकतात, हे तिळाचे तेल तुम्हाला मार्केटमध्ये बाजारामध्ये सहज मिळून जाईल.

नसेल ते उपलब्ध तर तुपाचा दिवा लावावा लागेल, तर हा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे, ज्या ठिकाणी आपण पूजा करत आहे,त्या पाठावर ती एक तांब्या ठेवायचा आहे. हा तांब्या जर तांबेय धातूपासून बनलेला असेल, अतिउत्तम आहे, त्यामध्ये तांब्याभर पाणी घ्यायचे आहे. त्या पाण्यात एक सिक्का टाकायचा आहे, कीती ही 1 रुपया 2, 5, 10 कोणताही का एक सिक्का टाकायचा आहे, आणि एक लवंग टाकायचे आहे साबूत लवंग साबुत म्हणजे जिला समोर फुल आहे आणि जी खराब नाही, तुटलेली फुटलेली नाही, असे साबूत लवंग आपण त्या तांब्यामध्ये टाकायचे आहे.

पाण्यात टाकायचे आहे, तांब्यावरती काहीतरी झाकण ठेवायचे आहे, प्लेट वगैरे आणि त्यानंतर हनुमान चालीसाचा पाठ करण्यास आपण प्रारंभ करायचा आहे. मित्रांनो दररोज एक वेळ ठरवा, त्या निश्चित वेळी आपण हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे. तुम्ही दिवसभरात कधीही उपाय करू शकता, मात्र सकाळची वेळ आणि सूर्य मावळल्यानंतर जी वेळ आहे, ती सर्वश्रेष्ठ आहे. किंवा रात्री एक दहा अकरा बारा वाजता हा उपाय केले, तरी चालते मात्र 11 दिवस सलग हा उपाय करायचा आहे.

अगदी त्याच वेळी जर मी रात्री 9 वाजता हा उपाय करणार, तर दररोज नऊ वाजताच, मला हा उपाय करावा लागणार आहे. वेळेमध्ये बदल करता कामा नये, हा उपाय करण्यापूर्वी स्वच्छ स्नान करणे आवश्यक आहे, स्नान करणे शक्य नसेल,तर कमीत कमी हात-पाय-तोंड आणि कान व्यवस्थित धुवायचे आहे. शक्यतो, लाल रंगाचे वस्त्र आपण स्वतः परिधान करायचे आहे, आणि हा उपाय करण्यास प्रारंभ करायचा आहे, हनुमान चालीसा चा तीन वेळा सलग तीन वेळापाठ आपण करणार आहे.

हा पाठ केल्यानंतर हनुमानाचा एखादा मंत्र येत असेल तर, त्या मंत्राचा जप करा, हनुमानाची आरती कापुराच्या साहाय्याने आपण ओवळा, म्हणजे फक्त हनुमान चालीसाचा 3 वेळा पाठ करणे ठीक आहे. मात्र जर तुमची इच्छा असेल तर आपण त्यांचा एखाद्या मंत्राचा जप किंवा “जय श्रीराम जय श्रीराम” 11 वेळा बोलू शकता. त्या ठिकाणी आपण उपाय करू शकतात, मात्र हनुमान चालीसाचा 3 वेळा पाठ पुरेसा आहे. हा पाठ केल्यानंतर आपण जो नैवेद्य हनुमानांना दाखविला आहे, तो नैवेद्य ते आपण आपल्या कुटुंबीयांमध्ये सर्वांमध्ये मिळून-मिसळून खायचे आहे.

अकरा दिवस पूर्ण झाल्यानंतर यामध्ये जो एक रुपया आपण टाकलेला आहे, जो सिक्का आहे जी लवंग आहे, ती काढायची आहे. हा शिक्का ही लवंग आपण कायम आपल्या जवळ सांभाळून ठेवायचे आहे, कायमस्वरूपी जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडाल. ही लवंग हा एक रुपया कृपया तुमच्या सोबत घ्या, तुम्ही जर एखाद्या खिच्यामध्ये ठेवला, तरी चालेल, पर्स पॉकेटमध्ये ठेवले तरी चालेल, फक्त या रुपया लवंगी जवळ कोणतीही अशुभ वस्तू अ धार्मिक वस्तू येणार नाही. याची मात्र काळजी घ्या आणि जे पाणी आहे, महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना हेजल स्वतःला प्राशन करा.

थोडेसे हे पाणी प्या, आणि मग बाहेर पडा हनुमान चालीसा ची ताकद काय आहे. हनुमान चालीसा चा प्रभाव नक्की काय असतो, हे तुम्हाला समजून जाईल, आणि हो हा उपाय आपण अकरा दिवस गेल्यानंतर दर शनिवारी मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन. त्यांचे दर्शन द्यायला मात्र विसरू नका, कारण हनुमान च्या कृपेने तुमची जी इच्छा आहे. मनोकामना, संकट दुःख आहे, हे सर्व काही तुमच्या मनामध्ये जे काही आहे,त्याची पूर्तता होणार आहे.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *