मिठाचे परिणाम आत्ताच जाणून घ्या, घरात येईल लवकरच सकारात्मक ऊर्जा !
मानवी जीवन जगत असताना आपल्याला अनेक गोष्टींचा वापर करावा लागतो त्यातील एक महत्त्वाची वस्तू म्हणजे मीठ. मित्रांनो मीठ हा असा एक पदार्थ आहे तो दिसायला अतिशय पांढरा शुभ्र असतो परंतु या पदार्थाचा वापर अनेकदा केला जातो. मीठ हे चौदावे रत्न मानले जाते. मिठाचा उपयोग स्वयंपाक घरामध्ये आवर्जून केला जातो परंतु मिठाचा उपयोग फक्त स्वयंपाक घरापुरता मर्यादित नाही. मिठाचे अनेक उपाय सांगण्यात आलेले आहे. मीठ हे अध्यात्मशास्त्र, वास्तुशास्त्र आणि तंत्र मंत्र शास्त्रांमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे आणि म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला मिठाचे अनेक फायदे सांगणार आहोत, ज्यामुळे मिठाबद्दल तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळू शकते. मिठाचे अनेक फायदे वास्तुशास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे परंतु मिठाचा उपयोग देखील वास्तुशास्त्रांमध्ये अनेकदा केला जातो.
मित्रांनो मिठाचे अनेक फायदे तर होतात परंतु नुकसान देखील होत असतात. अनेकदा मीठ हे आपल्यासाठी सकारात्मक ठरते तर अनेकदा मीठ हे आपल्यासाठी नकारात्मक ठरत असते परंतु मीठ केव्हा नकारात्मक ठरते हे आपल्याला अनेकदा माहिती नसते. हेच आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. मिठाचा वापर ज्योतिष शास्त्र आणि वास्तुशास्त्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. या दोन्ही शास्त्रांमध्ये मिठाकडे एका वेगळ्या नजरेने पाहिले जाते. आपण सगळेजण स्वयंपाक घरामध्ये मिठाचा वापर करत असतो परंतु वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये शुद्धीकरणासाठी मिठाचा वापर प्रामुख्याने केला जातो. मिठाच्या मदतीने आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा लवकरच दूर करू शकतो त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी मीठ कारणीभूत ठरते मिठाचे अनेक उपयोग आपण घरामध्ये करू शकतो आपल्यापैकी अनेक जण घरामध्ये लादी पुसत असतात अशावेळी लादीपुताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ जर आपण मिसळले तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा तर दूर होते पण त्याचबरोबर लादीवर जर काही सूक्ष्मजीव जंतू असतील तर ते देखील नष्ट होतात.
मिठाचे अति सेवन केल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होत असतात. आपल्या घरामध्ये नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा दोन्हीही मोठ्या प्रमाणावर वास्तव करत असतात आणि अशावेळी घरातील सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी व घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाचा उपयोग केला जातो. अनेकदा आपल्या शरीरावर आणि मनावर नकारात्मक ऊर्जा भारी पडते आणि अशावेळी मनावरील व शरीरावरील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून या पाण्याने अंघोळ करायला हवे, असे केल्याने तुमच्या शरीरावर व मनावर असलेले सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाईल तुम्हाला सकारात्मक वाटू लागेल तुम्हाला चांगले वाटू लागेल. जर घरामध्ये वारंवार वाद होत असतील, घरातील सदस्य एकमेकांकडे सूडेच्या भावनेने पाहत असतील तर अशावेळी घरात शांतता टिकून ठेवण्यासाठी आपल्याला घरातील कोणत्याही कोपऱ्यामध्ये मिठाचे पाणी ठेवायचे आहे असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरातील सदस्यांमध्ये शांतता निर्माण होते.
जर तुम्हाला निद्रानाश स’मस्या सतावत असेल झोप लागत नसेल तर अशावेळी तुम्ही ज्या खोलीमध्ये झोपणार आहात त्या ठिकाणी मीठ आपल्याला ठेवायचे आहे असे केल्याने तुमची झोप जी नष्ट झालेली आहे ती पूर्ववत होणार आहे आणि तुम्हाला शांत झोप लागणार आहे. अनेकदा आपण चांगले कपडे परिधान करतो आणि बाहेर गेल्यावर अनेक जण आपले कौतुक देखील करतात, अशा वेळी अनेकांच्या नजरा आपल्याला लागण्याची शक्यता असते. जर नजर लागल्यावर तुम्हाला डोकेदुखी सतावत असेल तर अशावेळी घरी आल्यावर मिठाने तुमची नजर अवश्य काढा, यासाठी मीठ अंगावरून सात वेळा फिरवा आणि हे मीठ वॉशिंग बेसीन मध्ये टाकून वॉश करा असे केल्याने कोणाचीही वाईट नजर जर तुम्हाला लागली असेल तर तुम्हाला नजर मुक्ती होईल.
Recent Comments