या 6 गोष्टी करा आयुष्याची साडेसाती दूर होईल.. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ स्वामी यांच्या म्हणण्यानुसार या मनुष्य या सहा गोष्टी असतात तो व्यक्ती अत्यंत सुखी आयुष्य जगतो व त्याच्या मागील सर्व साडेसाती निघून जाते, चला तर मग जाणून घेऊया त्या सहा गोष्टी कोणत्या आहेत त्याबद्दल ..
नंबर एक गोष्ट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी कोणावरही अवलंबून राहू नये. व्यक्ती स्वतःचे आणि कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी स्वतः पैसा करण्यास सक्षम असेल तोच सुखी आयुष्य जगतो आणि मेहनत करून स्वतःचे आयुष्य जगण्यासाठी इतरांवर अवलंबून राहतात. अशा लोकांना स्वाभिमान असतो आणि इतरांच्या नजरेत त्यांना मानसन्मान ही असतो त्यामुळे स्वतः कष्ट करून आयुष्य जगावे.
नंबर दोन गोष्ट म्हणजे चांगल्या लोकांची संगत असणे. मित्रांनो जो व्यक्ती चांगल्या आणि विद्वान लोकांच्या संगतीत राहतो त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करतो त्याला सुखी मानले जाते. वाईट लोकांच्या संगतीचा परिणाम वा’ईटच होतो जे लोक दुष्ट आणि हिंसक लोकांच्या संगतीत राहतात त्यांना भविष्यात विविध अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे नेहमी चांगल्या माणसांच्या संगती मध्ये राहावे.
नंबर तीन ची गोष्ट म्हणजे मुक्त जगणे. ज्या व्यक्तीचे स्वतःपेक्षा जास्त ताकदवान व्यक्तीशी श’त्रुत्व असते तो प्रत्येक क्षणाला त्याच्या श’त्रूंच्या विचारात असतो ताकतवान श’त्रू त्याला आणि त्याच्या कुटुंबाला नुकसान पोहोचू शकतो. एखाद्या भीतीखाली जगणारा माणूस कधीच जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही त्यामुळे जो व्यक्ती जि’वंत असतो त्यालाच सर्वात सुखी मांडले गेले आहे.
नंबर चार ची गोष्ट म्हणजे कर्ज घेऊ नये.मनुष्याने स्वतःच्या गरजा असेल तेवढच इच्छा ठेवाव्यात.जो व्यक्ती मनावर नियंत्रण ठेवत नाही स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इतरांकडून कर्ज घेतात. इतरांकडून कर्ज घेऊन प्राप्त केलेल्या सुविधा कधीच सुख देत नाहीत. अनेक वेळा लोक घेतलेले कर्ज वेळेवर फेडू शकत नाही आणि यामुळे स्वतः सोबतच कुटुंबाला अडचणीत आणतात.जो व्यक्ती कर्जापासून दूर राहतो तो नेहमी सुखी राहतो.
नंबर पाच ची गोष्ट म्हणजे निरोगी व स्वस्थ शरीर. जीवनात सदैव सुखी राहण्यासाठी शरीर तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. शरीराला एखादी व्याधी असेल तर तुम्ही व्यवस्थित काही खाऊ पिऊ शकत नाही, अशा अवस्थेमध्ये तुम्ही जीवनातील अनेक सुविधांपासून वंचित राहू शकतात. जर तुम्हाला सामान्य आजार असेल तर त्यांचा त्रास सहन करावा लागतो.आजार मोठा असेल तर दवाखाना औषधे इत्यादी गोष्टींमध्ये पैसा आणि वेळ खर्च होतो. निरोगी शरीर असणारा व्यक्ती कोणतेही काम करण्यास सक्षम असतो. गरज पडल्यास तो शारीरिक श्रम करू शकतो.आजारी व्यक्ती कोणतेही काम करू शकत नाही त्यामुळे निरोगी असणे आवश्यक आहे.
पुढील गोष्ट म्हणजे स्वतः च्या देशात राहणे. अनेक कारणांमुळे लोक स्वतःचा देश सोडून परदेशात वास्तव्य करतात असे करण्यामागे कोणतेही कारण असो परंतु आपल्या देशात राहण्याचे जे सुख आहे ते इतर कोणत्याही ठिकाणी मिळू शकत नाही,तो मनुष्य स्वतःचे पूर्ण आयुष्य आपल्या लोकांमध्ये आपल्या देशात व्यतीत करतो तो सर्वात सुखी असतो तर मित्रांनो या सहा गोष्टी आपल्याला स्वामी यांनी सांगितले आहे, त्या सहा गोष्टी चे नीट पालन केले तो च आयुष्यातील सर्वात सुखी व्यक्ती असेल व त्याच्या मधील सर्व साडेसाती निघून जातील.
Recent Comments