शनिवारच्या दिवशी काळा धागा बांधण्याचे हे आहे शास्त्र जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल !
जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख-शांती, वैभव समृद्धी हवी असेल तर आजच्या लेखांमध्ये सांगितलेला उपाय अवश्य करायला हवा. अनेकदा आपण वेगवेगळ्या प्रकारची कामे करत असतो परंतु काम पूर्ण होत आहोत त्यामध्ये अडचणी निर्माण होत असतात. घरामध्ये सुख शांती नांदत असताना अचानक एखादे संकट येते आणि घरावर खूप साऱ्या गोष्टी एका मागोमाग एक कोसळू लागतात तसेच घरातील सदस्य एकामागून एक आजारी पडत जातात. घरामध्ये सुख शांती भंग होऊ लागते आणि अशावेळी घरामध्ये मोठ्या प्रमाणावर नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. जर तुमच्या बाबतीत देखील या सगळ्या घटना घडत असतील तर अशावेळी चिंता करू नका. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये आणि अध्यात्म शास्त्रांमध्ये असे अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत. या उपायांच्या मदतीने तुम्ही तुमचे जीवन समृद्ध बनवू शकतात. बहुतेक वेळा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये वास्तव्य करत असते अशावेळी आपण एखादी कार्य करत असताना ती नकारात्मक ऊर्जा बाधा निर्माण करत असते आणि आपले काम पूर्ण होत नाही. आपली चिडचिड होते आपण मानसिक तणावाखाली जातो. भरपूर मेहनत करून देखील आपल्याकडे पैसा येत नाही.
आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही. घरामध्ये आजारपण दिवसेंदिवस वाढत जाते आणि म्हणूनच या सर्व गोष्टींमुळे अनेकदा मनस्ताप देखील सहन करावा लागतो. पूर्वीच्या काळी आपल्या घरातील जेष्ठ मंडळी जर आपल्याला नजर लागली असेल किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्याला स्पर्श करू नये यासाठी काही उपाय करत असेल यातील एक उपाय म्हणजे काळा रंगाचा धागा बांधणे. घरातील जेष्ठ मंडळी आपल्याला अनेकदा सांगायचे की हा काळा धागा कमरेला बांधायला हवा. हाताला बांधायला हवा किंवा पायाला बांधायला हवा यामागे आपल्याला नकारात्मक ऊर्जा स्पर्श करू नये. ही एक भावना होती परंतु काळा धागा बांधण्याची एक वेगळी पद्धत देखील असते ही पद्धत अनेकांना माहिती नसते. ही पद्धत आज आपण देखील समजून घेणार आहोत. आपल्या शरीरावर बांधलेला हा काळा धागा मनुष्याला श्रीमंत बनू शकतो. तुमच्या आजूबाजूला असल्या नकारात्मक ऊर्जेला नष्ट करू शकतो.
आपल्या सर्वांना माहिती आहे की, मनुष्य शरीर हे पंचतत्वांनी बनलेले आहे. या पंचतत्त्वांमध्ये आकाश अग्नी जल वायू अन्न या सर्वांचा समावेश आहे. काळा रंग हा नजर लावणाऱ्या व्यक्तीची एकाग्रता भंग करत असतो आणि म्हणूनच आपल्याला शनिवारच्या दिवशी काळा रंगाचा धागा घ्यायचा आहे. हा काळा रंगाचा धागा परिधान केल्याने तुम्हाला कोणत्याही नकारात्मक ऊर्जेचा स्पर्श देखील होणार नाही परंतु यासाठी आपल्याला काळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे. हा धागा आपल्याला जवळच्या शनि देवाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आणि तिकडे तेलामध्ये बुडवायचा आहे आणि हे तेल आपल्याला शनि देवांना अर्पण करायचे आहे, त्याचबरोबर जर तुम्ही बजरंग बली यांच्या मंदिरामध्ये जाणार असाल तर अशावेळी हा काळ धागा बजरंगबली यांच्या चरणी ठेवायचा आहे आणि त्या धाग्याला शेंदूर देखील लावायचा आहे त्याचबरोबर तुम्ही काळा धागा ला सात गाठी देखील घालू शकता. ज्या काही स’मस्या तुमच्या जीवनामध्ये आहेत, त्या सगळ्या स’मस्यांचे प्रत्येक म्हणून गाठ बांधायची आहे आणि त्यानंतर हा धागा बजरंगबली यांच्या मंदिरामध्ये न्यायचा आहे.
तिथे चरणावर ठेवायचा आहे आणि त्यानंतर दिव्यावरून सात वेळा उतरवायचा आहे, त्यानंतर कोणाशी गप्पा न मारता आपल्याला घरी यायचे आहे. तत्पूर्वी असे करण्या आधी तुम्ही हनुमान चालीसाचे पटन देखील करू शकता. घरी आल्यावर आपल्याला हा धागा आपल्या देव्हाऱ्यामध्ये ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा धागा आपल्या दंडावर बांधायचा आहे. जर तुम्हाला धागा हा परिधान करायचा नसेल तर अशावेळी तुम्ही दुसऱ्या दिवशी हा धागा तुमच्या प्रवेशद्वारावर देखील लावू शकता, असे केल्याने तुमच्या घरामध्ये कोणत्याही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव दिसून येणार नाही. घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहील तसेच तुम्ही जर हा धागा दंडावर बांधणार असाल तर तुमच्या आजूबाजूला देखील नकारात्मक ऊर्जा स्पर्श करणार नाही. तुमचे जीवन अगदी सकारात्मक होऊन जाईल. भविष्यात अनेक सकारात्मक घटना घडताना दिसून येणार आहे. तुमच्यावर श्री शनिदेव व बजरंग बली यांचा कृपा आशीर्वाद नेहमी होणार आहे म्हणून आजच्या या लेखांमध्ये सांगितलेल्या माहितीचा उपयोग करून तुम्ही तुमचे जीवन अगदी समृद्ध बनवू शकता.
Recent Comments