“हे ” आहे तुलसी विवाह करण्यामागे कारण .. जाणून घ्याल तर व्हाल थ, तुळशी विवाह करण्याची योग्य पद्धत !

आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. ही माहिती तुळशी विवाह संबंधित आहे. मित्रांनो नोव्हेंबर महिन्यात चालू आहे आणि मराठी महिन्यानुसार कार्तिक महिना सुरू आहे. या कार्तिक महिन्यापासून एकादशी ते पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह साजरा केला जातो त्यानंतरच सगळीकडे लग्नाची लग्न आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच तुळशीचे विवाह हिंदूधर्म संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत. आजच्या या लेखांमध्ये घरच्या घरी तुळशी विवाह कशा पद्धतीने करायचा आहे कोण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे याबद्दल आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहोत.

तुळशीचे लग्न करताना त्यासाठी साहित्य देखील अत्यंत महत्त्वाचे ठरते. तुम्ही पूजेच्या साहित्य दुकानांमध्ये गेला तर तुम्हाला हे साहित्य सहजरीत्या उपलब्ध होते. या साहित्यांमध्ये आवळा, बो, चिंच, ऊस हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते त्याचबरोबर मांडोळे, बाशिंग हे देखील गरजेचे ठरतात. तुळशी विवाह करत असताना आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती गरजेची ठरते कारण की तुळशीचा विवाह हा श्री विष्णू यांच्यासोबत लावला जातो. जेव्हा आपण तुळशीचे विवाह करतो तेव्हा शृंगार अत्यंत महत्त्वाचा ठरतो आणि म्हणूनच तुळशीला अगदी स्त्री प्रमाणे सजविणे महत्त्वाचे यासाठी लाल रंगाची साडी चोळी, मंगळसूत्र जोडवी इत्यादी अशा अनेक शृंगार वस्तू आपल्याला या विवाहामध्ये आवर्जून आणायचे आहेत.

तुमच्या गावी जी पद्धत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही तुळशीचे लग्न लावू शकता. अनेक ठिकाणी बाळ गोपाळाची मूर्ती लग्न करताना ठेवली जाते, तर काही ठिकाणी शालिग्राम हा विष्णू अवतार म्हणून पुजला जातो. ज्या दिवशी तुम्ही तुळशीचे विवाह करणार आहात त्या एक दिवस आधी आपल्याला तुळशीची कुंडी छान मातीने रंगवायची आहे त्यावर सुंदर डिझाईन काढायचे आहे किंवा राधा दामोदर यांचे चित्र देखील तुम्ही काढू शकता. जर तुम्ही फ्लॅट सिस्टम मध्ये राहत असाल तर तुमच्या अंगानासमोरजागा कमी असेल अशावेळी तुम्ही बालकनी मध्ये किंवा गॅलरीमध्ये सहज तुळशी विवाह रचू शकतात यासाठी तुम्हाला अंगणामध्ये रांगोळी देखील काढायची आहे.

अनेक ठिकाणी तुळशीचे विवाह रचत असताना गौरीप्रमाणे तुळशीची सजावट केली जाते त्याचबरोबर तुळशी देवीला खणा नारळाची ओटी व लाल रंगाची साडी नेसवली जाते. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेशभूषा पद्धतीने देखील तुळशीचे लग्न जाते त्याचबरोबर तुळशीला लग्नाच्या दिवशी नैवेद्य अर्पण केले जाते त्याचबरोबर चिंच आंबट बोरे देखील दिले जातात. आता आपल्याला तुळशीचा विवाह करण्याआधी आपण ज्या पद्धतीने प्रत्येक कामाच्या वेळी श्री गणेशाची पूजा करतो त्याच पद्धतीने आपल्याला तुळशी विवाह देखील श्री गणेशाला आवाहन करायचे आहे, जेणेकरून या विवाहाला श्री गणेश स्वतः उपस्थित राहू शकतील आणि म्हणूनच श्री सिद्ध गणेशांच्या मूर्तीला आपल्याला हळद कुंकू वाहायचे आहे.

त्यानंतर आपण जे मंडप तयार केलेले आहे त्या मंडपाला देखील हळद-कुंकू वाहा यचे आहे त्यानंतर वरदेवताला म्हणजेच श्रीकृष्ण व शालिग्राम विष्णू देवतांना आपल्याला हळद कुंकू वाहायचे आहे आणि लग्न मुहूर्ताला आपल्याला लग्न लावताना कन्येचे दान देखील करायचं आहे अशाप्रकारे आपण उपस्थित मंडळीचा मदतीने मंगलाष्टके म्हणून लग्न लावू शकतो आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य म्हणून भोजन देखील करायचे आहे, अशा प्रकारे तुम्ही अगदी साध्या व सोप्या पद्धतीने तुम्ही तुळशी विवाह करू शकता. तुळशी विवाह केल्याने आपल्यावर माता महालक्ष्मी व श्री यांचा आशीर्वाद लाभतो. जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होतात माता तुळशी देखील तुमच्यावर प्रसन्न होते म्हणूनच यंदा तुळशी विवाह करायला विसरू नका आणि माता तुळशीचा आशीर्वाद अवश्य घ्या.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *